मंगळवार, १० जुलै, २०१२

खरिपाच्या पेरणीला सुरुवात

खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वाया जातात की काय अशी भीती शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. 
निसर्गाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. तेव्हा समाधानकारक पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बर्‍यापैकी पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला होता. तर उष्णेतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांना सुखद गारवा अनुभव्यास मिळाला होता. तसेच चांगल्या प्रकारे पाऊस होईल या आशेने शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते. त्यामुळे पाऊस पडेल की काय या प्रतिक्षेत शेतकरी असतो मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा