सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.



अंधाराला घाबरत नाय, आभाळाची साथ हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

शब्दामध्ये गोडवा आमच्या, रक्तामध्ये इमानदारी,
बघत नसतो कधी आम्ही, किती कुणाची जहागीरदारी,
अरे भगव्या समोर महाराष्ट्रातच, मराठीचा धाक हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय....

हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी रडतोय,
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास, पुन्हा घडतोय ,
हे नुसतेच तांडव नाही आमचे, अन्यायावर मात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

पुरे झाले आता तुमचे मराठीवर हल्ले,
बुरुजासकट  जागे करू माराष्ट्रातील किल्ले,
पाठीवरती अजून आमच्या, शूर शिवाचा हात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय...

स्मरण ठेवा तानाजीच, मरण आठवा संभाजीच,
स्वराज्यासाठी रक्त सांडला बाजीचा,
साल्यानी पाठीमागून वार केले, हाच मोठा घात हाय,
मोडेन पण वाकणार नाय, हि मराठ्याची जात हाय.....

बुधवार, १७ डिसेंबर, २०१४

माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....

तलवारीची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली...
माहीत नाही शहाजीराजे कोण,जिजाऊ कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पिढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
माणसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता, पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची, अन्
शुर गाथा शिवऱायानची .
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING च नाही करत,
तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई, जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

डॅशिंग रोहित शर्माची आणखी एक डबल सेंच्युरी







डॅशिंग रोहित शर्माची आणखी एक डबल सेंच्युरी
दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलेले रोहित शर्मा नावाचे वादळ आज पुन्हा कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर घोंघावले. एकदिवसीय सामन्यातील द्विशतकाचा सचिन, सेहवाग आणि स्वत:चाही विक्रम मागे सोडत रोहितने गुरुवारी 264 धावांचे नवे ‘एव्हरेस्ट’ उभे केले. घणाघाती तरीही नैसर्गिक अभिजात शैलीत त्याने श्रीलंकन गोलंदाजांना तोड-तोड तोडले. एका खेळाडूने दोन द्विशतक ठोकण्याचा इतिहासही त्याने 8क् हजार कोलकातावासीयांच्या साक्षीने रचला. 

चित्त जेथो भॉयशून्य..
इडन गार्डनची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल साजरी करणा:यांसाठी रोहित शर्माचे हे 173 चेंडूंचे पर्व अक्षरश: ‘भीषूण भालो’ होते. केवळ गुरुदेव टागोरांच्या शब्दांतच या तुफानाचे वर्णन होऊ शकते.. चित्त जेथो भॉयशून्य! (व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर)

द्विशतकवीर!
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतार्पयत द्विशतक ठोकणारे तीनही भारतीयच राहिले आहेत. त्यातही रोहितने दोन वेळा द्विशतक मारले आहे.

पहिले : सचिन तेंडुलकरने वन-डेत पहिले द्विशतक ठोकण्याचा मान पटकावला. ग्वालिअर वन-डेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 24 फेब्रुवारी 2क्1क् रोजी 147 चेंडूंत नाबाद 2क्क् धावा केल्या. 


दुसरे : वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2क्11 रोजी इंदौर येथे वेस्ट इंडिज विरुद्ध 149 चेंडूंचा सामना करत 219 धावांची खेळी करून सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला होता. 


तिसरे : रोहित शर्माने 2 नोव्हेंबर 2क्13 रोजी बंगळुरू वन-डेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत 2क्9 धावा चोपल्या होत्या. त्यासाठी त्याने 158 चेंडू खेळून काढत 12 चौकार व 16 षटकार खेचले होते.


हा विक्रम हुकला..
मुंबईच्या या फलंदाजाला लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या अॅलिस्टेयर ब्राऊनचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मागे सोडण्यात अपयश आले. ब्राऊनने 268 धावांची खेळी केली होती. ब्राऊनने र्सेविरुद्ध ग्लेमोर्गनविरुद्ध 2क्क्2मध्ये ओव्हल मैदानावर हा विक्रम नोंदविला होता. 

हा विक्रम केला..
रोहितने भारतातर्फे लिस्ट ‘ए’ सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदविला. त्याने आज संघसहकारी शिखर धवनचा विक्रम मोडला. धवनने 12 ऑगस्ट 2क्13 रोजी भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध प्रिटोरियामध्ये 248 धावांची खेळी केली होती.   

मैदान व्यापले
यष्टिरक्षकाच्या बरोबर मागचा आणि पॉइंट व थर्डम्यानच्या मधील एक छोटा भाग सोडला तर हे अवघे मैदान व्यापून टाकणारे फटके.

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी

दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
दारू बिरू पियुन अगदी झींगली होती कार्टी.
दुख म्हणाले "दोस्तानो!!बिलकुल लाजू नका
इतके दिवस छळले म्हणून राग मानू नका
मनात खूप साठलं आहे  पण काहीच सुचत नाही
माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता मला  राहवत नाही
मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा एका जत्रेत गेलो होतो
गर्दी अशी जमली नि गोंधळ असा उठला.....
.माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला
तेव्हापासून फिरतोय शोधत सुखाला दुनियेच्या जत्रेत
पाहतोय दिसते का सुख माझे कोणाच्याही नजरेत
सूखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने दुख ढसाढसा रडले
नशा सगळ्यांची उतरली दुखाकडे पाहून
दुखालाही सुख मिळावे असे वाटले सगळ्यांना राहून राहून
सुखाच्या शोधामध्ये आता मी सुद्धा फिरतोय
दुखाला शांत करायचा खूप खूप प्रयत्न करतोय
जीवनाच्या रथाचे आहेत सुख दुख सारथी
सुख जर मिळाले तर सगळ्यांना तेंव्हा दुखाच्या घरी परत  मीच देईन पार्टी.......… .


कॉपी पेस्ट टेक्नोलॉजी च्या सहायाने . . . कविता ज्याची कुणाची आहे त्याच्याकडे कवितेचे हक्क पूर्णपणे अबाधित 
-- Unknown

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

हे क्रांतिकारकांनो...!




बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला..
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला..
खाणं-पिणं, मौज-मजेला वेळ आम्हाला दिला


बरं झालं तुम्ही रक्त-मांस सांडलं..
सिमेंट-विटा समजून आम्ही घर त्यावर बांधलं
बरं झालं तुम्हीच चलेजाव म्हटलं..
संस्कार नि संस्कृतिला सहज आम्ही सोडलं

बरं झालं तुम्ही स्वातंत्र्य मिळविलं..
मुक्तपणे शील आम्ही वेशीला टांगलं
बरं झालं तुम्हीच तिरंगा फडकाविला..
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला..
खुर्चीसाठी भांडणे पाहायची वाचला..!


- मुन्ना बागुल
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

शुक्रवार, २५ जुलै, २०१४

शेतकरी राजा



बैल जुंपले नांगर
करावया मशागत,
भर उन्हात हकारीतो
राजा सरजाचीरे पात ||

माझा बाप शेतकरी
भर उन्हात कष्टकरी
नाही उन पावसाची जाण
धरती त्याचारे आहे प्राण ||

डौलदार पिक याव म्हणुनच
जिव ओवाळून टाकी

मातीच जिवरे तुझा तरिही
का झेलतो कर्जाचा बोजा  ||

राञं दिस एक करूनही
पिक भरवशाच  नाही
दुखः त्याच्याच नशिबी
सुखाची त्याला ओढ नाही||

जगवतो उभ्या जगाला
त्याच्या परी देव नाही
माझा बाप शेतकरी
सार्या व्यापाराचा  हितकरी||

त्याची किमयाच न्यारी
जगाचे जिवन त्याच्या उरी
गर्व आहे आम्ही पोरं त्याची
गातो थोरवी जगाच्या पोशिंद्याची ||

      विराट शिंदे {9673797996}

शुक्रवार, ३० मे, २०१४

शिपिंग क्षेत्रातील संधी



शिपिंग लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधींची ओळख-
जहाजे नसती, तर अध्र्या जगातले व्यवहार ठप्प होतील. व्यापाराचे आकारमान आणि मूल्य लक्षात घेता जगभरातील ९० टक्क्य़ांहून अधिक व्यापार हा जहाजामार्गे होतो. जशी लोकसंख्या वाढते विकसनशील देशांची प्रगती होत जाते, तसतसा हा व्यापार वाढत जातो. आपल्या देशामध्ये, पंजाब इतर उत्पादन क्षेत्रांमधून जो माल व्यापारासाठी येतो, तो कंटेनर्समधून पाठवला जातो. त्यामुळे वाहतुकीचे लॉजिस्टिक्स हासुद्धा शिपिंगचा अविभाज्य घटक आहे.

भारताने २०२० सालापर्यंत १०० कोटी टन माल व्यापारासाठी पाठवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. आजमितीस आपण केवळ ६०० दशलक्ष टन इतकाच माल हाताळू शकतो. नजीकच्या भविष्यात मोठय़ा बंदरांची वाढ तसेच नवीन बंदरे विकसित करण्याची कामे हाती घेतली आहेत. गुजरातने खासगी बंदरे विकसित करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. यातील काही बंदरे, मोठय़ा सरकारी बंदरांपेक्षाही भव्य आहेत. महाराष्ट्रामध्येही रेड्डी (रायगड), रेवस, दिघी, जयगड, लवगाव आणि धमणकोळ इथे नवीन बंदरे विकसित होत आहेत. बऱ्याचशा किनारी राज्यांमध्येही खासगी बंदरे विकसित होत आहेत. आखाती देश, मध्यपूर्व दक्षिणपूर्व आशियामध्ये बंदर व्यवस्थापनाशी संबंधित कामे (नियोजन, एजन्सीची कामे, स्टिवेडोअरिंग .) बाहेरून आलेले तज्ज्ञ अधिकारी करतात. भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवामुळे इथे प्राधान्य दिले जाते. ही सर्व कामे व्यवस्थापनाशी संबंधित असल्यामुळे स्त्री-पुरुषांना समान संधी उपलब्ध आहेत.

बी.बी.. (शिपिंग लॉजिस्टिक्स)

शिपिंग लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये करिअरच्या अशा अमाप संधी उपलब्ध असूनही, या क्षेत्रामधील विशेष शिक्षण मात्र सहज उपलब्ध नाही. उद्योगधंद्यांना त्यासाठी बी.कॉम. एम.बी.. पदवीधर यांच्यावर अवलंबून राहावे लागते. वास्को--गामा, गोवा येथील एम..एस. कॉलेजने पुढाकार घेऊन बी.बी.. (शिपिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट) हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. मान्यताप्राप्त संस्थेच्या कुठल्याही शाखेतून (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनल) बारावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करायला पात्र ठरू शकतात. हा पदवी अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाशी संलग्न असून 'यूजीसी'च्या (विद्यापीठ अनुदान आयोग) 'इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री रिलेटेड प्रोग्राम्स' या योजनेखाली निवडला गेला आहे. शिपिंग क्षेत्रातील बहुतेक अभ्यासक्रम तांत्रिक स्वरूपाचे असतात. हा आगळावेगळा अभ्यासक्रम मात्र शिपिंग व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

या अभ्यासक्रमामध्ये शिपिंग व्यवस्थापन लॉजिस्टिक्सशी संबंधित अनेक विषय शिकवले जातात. उदा. बंदर एजन्सी व्यवस्थापन, मेरिटाइम लॉ, मेरिटाइम इन्शुरन्स, चार्टरिंग, संगणक व्यवस्थापन . याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील वित्त मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, उत्पादन व्यवस्थापन असे अनेक विषयही शिकवले जातात. शिकवण्याची अनोखी पद्धत विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी प्रशिक्षित करते. अधिक माहिती www.beamsgoa.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

करिअरच्या संधी

ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. हे पदवीधर बंदरे, शिप ब्रोकर्स, फ्रेट फॉर्वर्डिग कंपन्या, शिपिंग लॉ कन्सल्टंट, एअर कार्गो, आयात-निर्यात कंपन्या, मरीन इन्शुरन्स कंपन्या, लॉजिस्टिक्स रीटेल क्षेत्र . ठिकाणी काम करू शकतात. या क्षेत्राची व्याप्ती यातील अनेक संधी यांचा विचार केला तर अशासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्याची आज गरज आहे, असे म्हणावे लागेल. आपल्या देशामध्ये मेरिटाइम लॉमेरिटाइम इन्शुरन्स, ब्रोकरेज, चार्टरिंग संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाच्या संधीही उपलब्ध नाहीत. आपण अजूनही त्यासाठी इंग्लंडवर किंवा तिथे शिकून आलेल्या मोजक्याच तज्ज्ञांवर अवलंबून आहोत. तेल प्रदूषण, अपघात . अनेक बाबींसाठी भारतीय विमा कंपन्याच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला परदेशी सेवांवर अवलंबून राहावे लागते. चेन्नई येथील इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने या संदर्भात काही ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.नजिकच्या भविष्यात यासंदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच संशोधनातील संधी विद्यार्थ्यांना  उपलब्ध झाल्या तर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात भर पडेल, हे निश्चित.


For Details :  http://www.loksatta.com/career-vrutant-news/opportunities-in-shipping-551358/

शुक्रवार, १६ मे, २०१४

आयुष्याची वाट



आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाटही जगते।।४।।

'वाट' लागण्यात सुध्धा
'वाटे'चीच बाजी।
चुकली 'वाट' तरी
'वाटे'चीच बाजी।।५।।

↝↝S. More↜↜

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

प्रयत्न

प्रयत्नांना पर्याय नाही
आडवाट नाही; पळवाट नाही
प्रयत्न ही एक प्रक्रिया आहे..
प्रतिष्ठा असो वा धन,
यश असो वा सन्मान,
कौशल्य असो वा ज्ञान,
प्रयत्नांशिवाय प्राप्ती नाही.
प्रयत्नांशिवाय पात्रता नाही.
मुंगी जे खाद्य घेऊन वावरते
ते तिच्या अंदाजे आठपट असतं,
सुगरणीचा खोपा वा कोळ्याचं घर
आपल्यासाठी नवल असतं..
अंगभूत कौशल्य असतंच, मात्र
त्यात पारंगत बनण्यासाठी;
किंवा साध्य प्राप्त करण्यासाठी
प्रयत्नांमध्ये सातत्य हवं..
नियोजन, शिस्त नि लक्ष्य हवं.
स्वत:च्या क्षमता नि वेगळेपण
प्रयत्नांशिवाय कळत नाही,
कृतीतून अनुभवल्याशिवाय
शहाणपण काही मिळत नाही.
प्रयत्न करणाऱ्यांसाठी कठीण
वा अशक्य असं काही नसतं,
धडपडणाऱ्या मनामनांत
'कोलंबसचं गीत' प्रेरणा असतं.
ग्रहांच्या अपेक्षित फलापेक्षा
प्रयत्नांचा 'निग्रह' अधिक हवा.
आकाशाला कवेत घेण्यासाठी
प्रयत्नांवरच भरवसा असावा.
'काय करू नये' ठरवलं की,
स्वत:ला आपसूक गवसत जातो.
चुकत माकत चकचकीत होत
माणूस म्हणून घडत राहतो................................

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

स्वस्तात मस्त फोनची दुनिया............



मोबाइल घ्यायचा म्हटलं की त्याच्या स्पेसिफिकेशन्सच्याही आधी आपण आपले बजेट ठरवतो आणि मग त्यानुसार मोबाइलची निवड करीत असतो. असे करत असताना आपल्याला परवडणाऱ्या मोबाइल्सची यादीच आपल्यासमोर येते. पण त्याचा ब्रँड नावाजलेला नसतो. अशावेळी आपल्या मनात धस्स होतं आणि हा फोन घ्यायचा की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. फोन्सची निवड करत असताना काय काळजी घ्यायची, ते काही पर्याय आज आपण पाहू या.
भारतात मोबाइलचा वापर वाढत आहे हे काही नव्याने सांगणे गरजेचे नाही. पण यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात उतरल्या. याचा फायदा असा झाला की मोबाइलच्या किमती कमी झाल्या. यामुळे सामन्यांच्या खिशातही जास्त सुविधा असलेला मोबाइल दिसू लागला. आंतरराष्ट्रीय माहिती मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार भारतीय ब्रँडची विक्री गेल्या वर्षांत कमालीची वाढली आहे. भारतीय कंपन्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी सन २०१३ मध्ये मोबाइल मार्केटमध्ये ३२ टक्के आपला वाटा नोंदविला आहे. यामुळे बडय़ा कंपन्यांच्या स्थानाला काही धक्का बसला नसला तरी त्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. याच भारतीय कंपन्या येत्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास एचडीमध्ये मिळतात. याची किंमत १५ हजापर्यंत असल्यामुळे जास्त सुविधा आणि कमी पसे अशी गणिते असलेले ग्राहक मायक्रोमॅक्सचा पर्याय स्वीकारतात. यामध्ये सध्या कार्बन, लावा, इंटेक्स, आयबॉल, झोलो, सेलकोन, जोश अशा कंपन्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचेही विविध फोन मार्केटमध्ये येत असल्यामुळे अनेकांना ते पर्यायही योग्य वाटत आहेत. हे सर्व पर्याय चिनी मोबाइलपेक्षा चांगले असतात. या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात अगदी तीन ते चार हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामुळे सध्या आपल्यला स्वस्त आणि मस्त असे फोन उपलब्ध झाले आहेत.
भारतीय बाजारपेठ ही किमतीवर चालणारी आहे. हे लक्षात घेऊन भारतीय कंपन्यांनी चांगल्या सुविधा असलेले मोबाइल स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. हे मोबाइल स्वस्त आहेत म्हणून ते चांगले नाहीत असा अनेकांचा समाज असतो. हे काही प्रमाणात सत्य असले तरी ज्यांना जास्त पसे खर्च करावयाचे नसतील त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी वाईटही ठरत नाहीत. या कंपन्यांचे फोन २० हजार रुपयांत आपल्याला ४० हजार रुपयांचा फोन वापरात असल्याचे भासवतात. म्हणजे तशा ९९ टक्के सुविधा या फोन्समध्ये असतात.

स्मार्टफोन घेताना कोणती काळजी घ्याल-
तुम्ही कोणत्याही कंपनीचे स्मार्टफोन घेत असाल तेव्हा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात जर तुम्ही स्वस्त फोन घेत असाल आणि तुमच्या मनात शेकडो प्रश्न पडत असतील तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
स्क्रीनचा दर्जा- स्मार्टफोन घेताना तुम्ही स्क्रीनचा दर्जा तपासणे नक्कीच योग्य ठरेल. यामध्ये स्क्रीनचा आकार किमान तीन ते चार इंच इतका असावा. त्याचे रिझोल्यूशन किमान ३२० गुणिले ४८० इतके असावे. ही स्क्रीन फोटो पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी तशी योग्य नसते. यामुळे तुम्हाला बजेट वाढविणे शक्य असेल तर स्क्रीनचे रिझोल्यूशन हे किमान ४८० गुणिले ८०० इतके असावे.
प्रोसेसरचा दर्जा - स्वस्त मोबाइलमध्ये प्रोसेसर कमी क्षमतेचे असतात. यामुळे त्याची क्षमता तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये बहुतांश वेळा एक गिगाहर्टझचा सिंगल कोर प्रोसेसर असतो. यामुळे फोन स्लो होणे किंवा काम करताना बंद पडणे असे प्रकार होतात. यामुळे फोन घेताना किमान डय़ुएल कोर असणे गरजेचे आहे. यामुळे फोन चांगल्या प्रकारे चालू शकतो.
कॅमेरा- फोनमध्ये किमान पाच मेगापिक्सेल कॅमेरा असावा. यामध्ये एलईडी फ्लश असावा. यामुळे तुम्हाला फोनमध्ये चांगले फोटो आणि व्हिडीओ आपण रेकॉर्ड करू शकतो. काही फोन एचडी कॅमेरा देतात. पण हे कॅमेरे व्हीएजी रेझोल्यूशनवर आधारित असतात. काही फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. याद्वारे तुम्ही व्हिडीओ कॉल्स करू शकतात.
ऑपरेटिंग सिस्टीम- अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोनच सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे फोनमध्ये . ओएस असलेलेच फोन विकत घ्या. जर तसे झाले नाही तर तुम्हाला नवीन अप्स वापरणे शक्य होणार नाही. िवडोज वर आधारित स्वस्त फोन शक्यतो विकत घेऊ नका.
सेवा केंद्रांची यादी- हे फोन घेतल्यावर आपल्या जवळील सेवा केंद्रांची यादी जरूर घ्या. या कंपन्या नवीन असल्यामुळे त्यातील बहुतांश कंपन्याचे सेवाकेंद्र सर्वत्र उपलब्ध नाही आहेत. यामुळे याबाबत जागरूक राहणे अधिक फायद्याचे ठरेल.
फोन्सचे काही पर्याय
इंटेक्स 'ॅक्वा ऑक्टा'
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची एक कॉमन तक्रार आहे, ती बॅटरी लाइफबद्दल.. इंटरनेट, व्हॉट्स ॅपमुळे बॅटरी झपाझप संपते आणि दिवसातून दोन वेळा चार्ज करूनही ती पुरत नाही. सगळ्यांचीच ही ओरड ऐकल्यानंतर, बॅटरी जास्त काळ टिकावी या दृष्टीनं इंटेक्सनं आपल्या 'ॅक्वा ऑक्टा'मध्ये सुसज्ज यंत्रणा बसवली आहे. . गिगाहर्ट्झ एमटी ६५९२ ऑक्टा कोअर चिपसेट आणि दोन जीबी रॅममुळे हा फोन सुस्साट वेगानं चालेल, असा कंपनीचा दावा आहे. त्यात अँड्रॉइड . जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेय. दोन सिमच्या या मोबाइलची स्क्रीन सहा इंची असून वजन १८० ग्रॅम आहे. २३०० बॅटरीच्या जोरावर हा फोन सहा तासांचा टॉक टाइम आणि १८० तासांच्या स्टँडबायची खात्री देतो. 'ॅक्वा ऑक्टा'मध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
किंमत- १९, ९९९
मायक्रोमॅक्स कॅन्व्हास
या फोनमध्ये आपल्याला सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असून त्याचं स्क्रीन पाच इंचांचा आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्रोसेसर क्वाड कोर आहे. यामध्ये आपल्याला एचडी व्हर्जनही उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये 'ब्ल्वो टू अनलोक' आणि 'स्मार्ट पॉज व्हाईल वॉचिंग व्हिडीओ' असे नवे पर्याय देण्यात आले आहेत. याचा कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. या सिरीजमध्ये आपल्याला ९६९० पासून ते १७ हजापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कार्बन टिटानियम
या कंपनीनेही स्मार्टफोन बाजारात आणले असून ते . इंच डिस्प्लेचे आहेत. हे डिस्प्ले पूर्णत एचडी असे आहेत. यामध्ये क्वाड कोर प्रोसेसर वापरण्यात आला असून कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंग गालाक्सी मेगाला चांगला पर्याय ठरू शकतो. याची किंमत १९९९० इतकी आहे. यामध्ये आणखी स्वस्त फोनही उपलब्ध आहेत.