शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

आई भवानी तुझ्या कृपेने


आई भवानी तुझ्या कृपेने


आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं


गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्‍ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं


अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये


गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये


अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं



गीत - अजय-अतुल
संगीत - अजय-अतुल
स्वर - अजय गोगावले
चित्रपट-सावरखेड एक गाव (२००४)

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

आयुष्य तेच आहे







आयुष्य तेच आहे
 
 
आयुष्य तेच आहे
अन्‌ हाच पेच आहे !

बोलू घरी कुणाशी ?
तेही सुनेच आहे !

तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे !

केलीस याद तूही
का हे खरेच आहे ?
गीत-संगीता जोशी
संगीत-भीमराव पांचाळे
स्वर-भीमराव पांचाळे
अल्बम-एक जख्म सुगंधी

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

स्मरणातील मराठी गीते

रक्तामध्ये ओढ मातिची
 
 
रक्तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्‍त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा


 ------------ -------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा------------ --------- -
 
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा
...

नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे
शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा

कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा

गरजले सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आहे आवाज मराठीचा
तेजोमय तलवार तळपते
येथे ललकार मराठीचा

विवेधतेतला नाद
साज मराठीचा

एक चिंगार
मराठीचा

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

सचिन भवितव्याचा निर्णय घेणार नोव्हेंबरमध्ये



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपण आत्ताच निवृत्तीचा विचार केला नसून भवितव्याबाबत नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेऊ, असे जाहीर केले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने ही बाब स्पष्ट केली.
गेली २३ वर्षे आपल्या तडाखेबाज फलंदाजीने क्रिडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विक्रमवीर आता ३९ वर्षांचा झाला असून अनेक स्तरांतून त्याच्या निवृत्तीबद्दल आडाखे बांधले जात आहेत. सुनिल गावस्कर आणि मोहम्मद अझरुद्दीनसारख्या काही माजी खेळाडूंनीही सचिनच्या मैदानावरील हालचालींत आता पूर्वीची चपळाई राहिली नसल्याचे बोलून दाखवले आहे.
वाढत्या वयानुसार सर्वांच्याच हालचाली मंदावतात. पण जोपर्यंत आपण मैदानावर चांगली कामगिरी करू शकतो, तोवर खेळत राहण्याचा निर्धार सचिनने व्यक्त केला. तसेच तूर्तास निवृत्तीचा विचार मनात नाही. पण ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण पुरेशी चांगली कामगिरी करू शकत नाही तेव्ही आपण निवृत्ती जाहीर करू, असे सचिनने सांगितले. निवृत्तीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. मी एकेका मालिकेतील कामगिरीचा सध्या विचार करत आहे. पण नोव्हेंबरमध्ये एकंदर कामगिरीचा फेरआढावा घेऊन निर्णय घेईन, असे सचिनने स्पष्ट केले.


मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

जीवनाची ए बी सी ............................



A - Accept
Accept others for who they are and for the choices they've made even if you have difficulty understanding their beliefs, motives, or actions.

B - Break Away
Break away from everything that stands in the way of what you hope to accomplish with your life.

C - Create
ABC of Life

Create a family of friends whom you can share your hopes, dreams, sorrows,and happiness with.

D - Decide
Decide that you'll be successful and happy come what may, and good things will find you. The roadblocks are only minor obstacles along the way.

E - Explore
Explore and experiment. The world has much to offer, and you have much to give. And every time you try something new, you'll learn more about yourself.

F - Forgive
Forgive and forget. Grudges only weigh you down and inspire unhappiness and grief. Soar above it, and remember that everyone makes mistakes.

G - Grow
Leave the childhood monsters behind. They can no longer hurt you or stand in your way.

H - Hope
Hope for the best and never forget that anything is possible as long as you remain dedicated to the task.

I - Ignore
Ignore the negative voice inside your head. Focus instead on your goals and remember your accomplishments. Your past success is only a small inkling of what the future holds.

J - Journey
Journey to new worlds, new possibilities, by remaining open-minded. Try to learn something new every day, and you'll grow.

K - Know
Know that no matter how bad things seem, they'll always get better. The warmth of spring always follows the harshest winter.

L - Love
Let love fill your heart instead of hate. When hate is in your heart, there's room for nothing else, but when love is in your heart, there's room for endless happiness.

M - Manage
Manage your time and your expenses wisely, and you'll suffer less stress and worry. Then you'll be able to focus on the important things in life.

N - Notice
Never ignore the poor, infirm, helpless, weak, or suffering. Offer your assistance when possible, and always your kindness and understanding.

O - Open
Open your eyes and take in all the beauty around you. Even during the worst of times, there's still much to be thankful for.

P - Play
Never forget to have fun along the way. Success means nothing without happiness.

Q - Question
Ask many questions, because you're here to learn.

R - Relax
Refuse to let worry and stress rule your life, and remember that things always have a way of working out in the end.

S - Share
Share your talent, skills, knowledge, and time with others. Everything that you invest in others will return to you many times over.

T - Try
Even when your dreams seem impossible to reach, try anyway. You'll be amazed by what you can accomplish.

U - Use
Use your gifts to your best ability. Talent that's wasted has no value. Talent that's used will bring unexpected rewards.

V - Value
Value the friends and family members who've supported and encouraged you, and be there for them as well.

W - Work
Work hard every day to be the best person you can be, but never feel guilty if you fall short of your goals. Every sunrise offers a second chance.

X - X-Ray
Look deep inside the hearts of those around you and you'll see the goodness and beauty within.

Y - Yield
Yield to commitment. If you stay on track and remain dedicated, you'll find success at the end of the road.

Z - Zoom
Zoom to a happy place when bad memories or sorrow rears its ugly head. Let nothing interfere with your goals. Instead, focus on your abilities, your dreams, and a brighter tomorrow.

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

भारताचे सर्व राष्ट्रपती

1. राजेंद्र प्रसाद ( Jan 26, 1950-May 13, 1962) : भारतचे पहिले राष्ट्रपती, एकमेव राष्ट्रपती दोन टर्म पूर्ण करणारे.

2. एस. राधाकृष्ण (May 13, 1962-May 13, 1967) : धर्म आणि सिद्धांताविषयी ज्ञान असणारे हुशार व्यक्ती, त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून पूर्ण साजरा केला जातो. 

3. झाकीर हुसैन (May 13, 1967-May 3, 1969) : शिक्षाविशारद् हुसैन त्यांचा कार्यकाल संपूर्ण होण्या अगोदरच मरण पावले.  

4. वी. वी . गिरी (Aug 24, 1969-Aug 24, 1974) : एक हुशार व्यक्ती ज्यांनी राष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणूच काम केले .  

5. फाख्रुद्दिन आली अह्मेद Ahmed (Aug 24, 1974-Feb 11, 1977) : यांनी इंदिरा गांधीच्या आणीबाणी घोषणेवर सही केल्या होत्या. ते देखील त्यांचा कार्यकाल संपूर्ण होण्या आगोदर मरण पावले .

6. नीलम संजीव रेड्डी (July 25, 1977-July 25, 1982) : काँग्रेसनी मतदान केल्यानंतर राष्ट्रपती झाले.  

7. गींनी झैल सिंघ (July 25, 1982-July 25, 1987) : यांच्या कार्यकाळात इंदिरा गांधीची हत्या झाली . 

8. आर. वेंकटरमण (July 25, 1987-July 25, 1992) : गांधी कुटुंब हे राज्य करते होते. ते स्वतंत्र भारताच्या अस्थायी संसदेचे घटक होते .

9. शंकर दयाळ शर्मा (July 25, 1992-July 25, 1997) : एक उपराष्ट्रपती ज्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली.  

10. के. आर. नारायणन (July 25, 1997-July 25, 2002) : थायलंड, तर्की, चीन आणि अमेरिका या देशांचे राजदूत म्हणून काम केलेले नारायणन यांनी अर्थशास्त्र हे हरोल्द  लास्की यांच्याकडून शिकले होते.

11. ए. पी. जे. अब्दुल कलम (July 25, 2002-July 25, 2007) : भारतच्या  प्रक्षेपणास्त्र आणि परमाणु अस्त्र यांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण भूमिका .

12. प्रतिभा पाटील (July 25, 2007- 2012) : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती .

13. प्रणब मुखर्जी (2012 - ) : चार दशके राजकारणात घालवणारे प्रणवदा यांची राष्ट्रपती म्हणून निवड याचवर्षी झाली.
 

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

Out dated झालंय आयुष्य

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय

दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

देहदंड हीच शिक्षा.. कसाबची

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी क्रूरकर्मा मोहंमद अजमल अमीर कसाबच्या फाशीवर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. मात्र फहीम अर्शद मोहंमद अन्सारी व सबाउद्दीन अहमद शब्बीर अहमद शेख या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 
भारतीय दंडविधान आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये एकूण सहा गुन्ह्यांसाठी कसाबला आधी मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलेल्या व नंतर उच्च न्यायालयानेही कायम केलेल्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आफताब आलाम व न्या. चंद्रमौली के. प्रसाद यांच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख यांना निर्दोष ठरविण्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने केलेले अपीलही न्यायालयाने फेटाळून लावले. 
मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे सीमेपलीकडून भारताविरुद्ध पुकारले गेलेले युद्ध होते. त्यात सहभागी होऊन १६६ निरपराध नागरिकांची हत्या करणारा कसाब कोणतीही दया दाखविण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने जाहीर केले.
आपल्याविरुद्धचा खटला स्वतंत्र व नि:पक्षपणे झाला नाही. आपल्याला सुरुवातीस वकील दिला गेला नाही. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या व्यापक कटात मी सहभागी नव्हतो. अल्लाच्या नावे 'ब्रेनवॉशिंग' केल्याने या गुन्ह्यात मी फक्त यंत्रवत सामील झालो, असे कसाबने घेतलेले बचावाचे नानाविध मुद्दे न्यायालयाने ठामपणे फेटाळून लावले. कोणताही दहशतवादविरोधी कायदा हाताशी नसताना देशाच्या इतिहासातील या सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन तड लावणे श्क्य झाले, हे विशेष उल्लेखनीय आहे. 


.आणि सैतान फक्त हसला!
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल ऑर्थर रोड तुरुंगात सांगण्यात आला, तेव्हा कोणतीही उघड प्रतिक्रिया न देता कसाब आपल्या खास बेफिकीर शैलीने फक्त हसला, असे सूत्रांनी सांगितले. कसाबने उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील अपिले तुरुंगातूनच केली होती. 
आजच्या निकालानंतर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा त्याचा विचार आहे की नाही, हे लगेच समजू शकले नाही. मात्र तो असे अर्ज करू शकतो, याची त्याला जाणीव करू देणे तुरुंग व्यवस्थापनाकडून अपेक्षित आहे. 

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

कणा -.... कवी कुसुमाग्रज


कणा


ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे

खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला 

मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !

- कवी कुसुमाग्रज

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

लक्ष्मण रिटायर्ड


न्यूझीलंडविरुद्ध २३ ऑगस्टपासून हैदराबादमध्ये प्रारंभ होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी लक्ष्मणची भारतीय संघात निवड झाली होती, पण त्याने अचानक नवृती जाहीर करीत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. १३४ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा आणि भारताला अनेक सामन्यांत संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या लक्ष्मणने स्थानिक प्रेक्षकांच्या साक्षीने अखेरचा कसोटी सामना खेळण्याची संधीही नाकारली. लक्ष्मणने अचानक नवृत्ती जाहीर करण्याचे कारण काय असावे, याची कुणाला कल्पना नाही, पण हैदराबादचा हा फलंदाज गेल्या काही आठवड्यांत घडलेल्या घटनांमुळे मात्र व्यथित होता, हे मात्र खरे आहे.
लक्ष्मणने नवृत्ती स्वीकारण्याचे कारण उघड केले नाही.
लक्ष्मणला नवृत्ती का स्वीकारावी लागली? हा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना भेडसावत आहे.

गुरुवार, २६ जुलै, २०१२

मराठी राजकारणाची अवकळा

राष्ट्रीय काँग्रेस आणि पवारांची काँग्रेस यांच्यात काल झालेला तह त्यांच्यातील संबंधितांच्या महत्त्वाकांक्षा काही काळ म्यान करणारा असला तरी त्यांच्यातील युद्ध संपविणारा नाही. शरद पवारांचे लक्ष्य लांबचे आणि उंचीचे आहे. ते गाठायचे तर त्यांना त्यांच्या बैठकीची सध्याची जागा अपुरी पडणारी आहे. तिचे क्षेत्रफळ वाढवून घेतल्याखेरीज त्यांना आणखी उंच उडी घेता येत नाही. कुरबुरी, कुरापती आणि रुसवेफुगवे प्रगटायचे आणि जमेल तेवढी जागा कोरून घ्यायची असे त्यांचे सध्याचे राजकारण आहे. ते जेवढे करमणूक करणारे तेवढेच त्यांच्याविषयीची अनुकंपा वाटायला लावणारेआहे. पवारांचा पक्ष स्वत:चे बळ वाढविण्याचा प्रयत्न करणार आणि तसे करताना त्याला काँग्रेसला दुबळे करावे लागणार हे राजकारण कोणालाही कळणारे आहे. पण दिल्लीत काँग्रेस बलशाली आहे आणि तिच्या बाजूने नवनवे व अधिकाधिक सार्मथ्यवान मित्र येऊन उभे राहताना एवढय़ात दिसले आहेत. उलट महाराष्ट्रात तो पक्ष पहिल्या क्रमांकावर असला तरी त्याचे स्थानिक नेतृत्व वेळकाढू राजकारण करणारे आहे. ते निर्णय लांबणीवर टाकते आणि कोणत्याही प्रश्नावर ठाम भूमिका घेताना कधी दिसत नाही. त्याचवेळी पवारांच्या मराठी अनुयायांचा वर्ग संघटित, आक्रमक आणि कोणत्याही आरोपाची फारशी पर्वा न करण्याएवढा उदंड आहे. त्या वर्गाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पक्षीय सहकार्‍यांची सर्व बाजूंनी कोंडीही चालविली आहे. सिंचन खात्यातील गैरव्यवहारावर ते सरकारला श्‍वेतपत्रिका काढू देत नाहीत. तटकर्‍यांवरील आरोपांची चौकशी करू देत नाहीत. लवासामधील घोळ निस्तरू देत नाहीत आणि राज्य सहकारी बँकेचे बुडीत प्रकरण धसाला लावू देत नाहीत. मुख्यमंत्र्यांना बहुमतासाठी ज्यांची गरज आहे ते असे अडवणूक करणारे आणि जे पाठिंबा देणारे व जवळचे आहेत ते त्यांच्या विश्‍वासात न बसणारे. त्यातून विरोधक बलवान. ते यांची गंमत दुरून पाहणारे आणि जमेल तेवढे तीत तेल टाकणारे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात समन्वय समित्या बनविल्या काय आणि त्यांच्या दरमहा बैठकी भरविल्या काय, त्यातून काही साध्य व्हायचे नाही. खर्‍या समझोत्याला विश्‍वासाचे वातावरण लागते. तो करणार्‍यांना परस्परांच्या हेतूविषयी आदर वाटावा लागतो. येथे दोन्ही बाजूंत नुसती स्पर्धाच नाही तर उभा सामना आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष यांना दिल्लीत जमले नाही तरी मुंबईत जमिनीवर लोळवू असा पवार पक्षाचा होरा तर त्यांना दिल्लीएवढेच महाराष्ट्रातही उघडे पाडू ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची तयारी. यातून त्यांचे पवित्रे व धोरणे ठरणार. आमच्यावर अन्याय होत असल्याची खरीखोटी ओरड करणार आणि राज्यात सगळेच कसे वाईट चालले आहे याची जाहिरात सरकारात बसूनच केली जाणार. समझोता, मैत्री, एकोपा हे सगळे स्वच्छव पारदश्री मनाचे विषय आहेत. 'मुख्यमंत्री काही करीत नाहीत' हे पवारांनी जाहीरपणे म्हणायचे आणि 'सिंचनाची श्‍वेतपत्रिका काढूच' हे चव्हाणांनी सांगायचे. या तेढीतून विश्‍वास कसा उभा राहील आणि पारदर्शिता तरी कशी येऊ शकेल? सारांश, हा सत्तेत टिकण्याचा, मंत्रिपदे उबविण्याचा व त्यासाठी वेळकाढूपणा करण्याचा आजवर चाललेला खेळ आहे आणि तो यांना तसाच आणखी काही काळ चालवायचा आहे. त्यात जमतील तेवढे एकमेकांचे कपडे फाडायचे आणि जमेल तेवढे परस्परांना उघडे करीत रहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आधी आघाडीधर्माने ग्रासले आणि आता त्या आघाडीतील महत्त्वाकांक्षांनी भेडसावले आहे. मराठी राजकारणाची ही अवकळा ज्या दिवशी संपेल तो खरा सुदिन समजायचा.


By Source : Lokmat.com

गुरुवार, १९ जुलै, २०१२

काका पंचत्वात विलीन..



बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी सार्शूनयनांनी आपल्या लाडक्या काकाचा अखेरचा निरोप घेतला. अक्षयकुमारचा मुलगा आणि राजेश खन्ना यांचा नातू आरव याने त्यांना मुखाग्नी दिला.

मंगळवार, १७ जुलै, २०१२

मृणालताई कालवश



जनसामान्यांसाठी केलेल्या आंदोलनातून पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई अशी ओखळ लाभलेल्या आणि सारे आयुष्य समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आज वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. 
वसई येथे मुलगी अंजली वर्तक यांच्याकडे गेल्या असताना त्यांना घशाचा त्रास होऊ लागल्याने कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृणालताईंच्या निधनामुळे रणरागिणी हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. 
मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे कुटुंबीय होते. बुधवारी त्यांचे पार्थिव वसईतून आणल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२पर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार गोरेगावातच होणार आहेत. निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. 
वैद्यकीय शिक्षणाला रामराम करून १९४७ साली त्यांनी समाजकारण आणि राजकारणाला वाहून घेतले. राष्ट्रीय सेवादलातून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एक वर्षातच काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली. महात्मा गांधी आणि लोहीया यांचा मृणालताईंवर मोठा प्रभाव होता. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या सहभागी झाल्या होत्या. १९७७ साली त्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. १९८0च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मृणाल व त्यांचे पती केशव गोरे यांनी गोरेगावमधील नागरी सोयीसुविधा सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रसाधनगृहे, सभागृहे, आरोग्य व कुटुंब नियोजन केंद्रे गोरेगावमध्ये त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. बिल्डरांपासून झोपडपट्टीयांना वाचवण्यातदेखील त्यांनी पुढाकार घेतला होता. 
कारकीर्द 
1961
साली नगरसेवक 
1972
साली राज्यात सर्वाधिक मते मिळवून विधानसभेत 
1977
साली जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत
1985 
साली पुन्हा लोकसभेत 

मंगळवार, १० जुलै, २०१२

खरिपाच्या पेरणीला सुरुवात

खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वाया जातात की काय अशी भीती शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. 
निसर्गाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. तेव्हा समाधानकारक पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बर्‍यापैकी पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला होता. तर उष्णेतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांना सुखद गारवा अनुभव्यास मिळाला होता. तसेच चांगल्या प्रकारे पाऊस होईल या आशेने शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते. त्यामुळे पाऊस पडेल की काय या प्रतिक्षेत शेतकरी असतो मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे.

रविवार, १ जुलै, २०१२

उसाची लागवड धोक्यात

बारामती व इंदापूर तालुक्यातील छत्रपती, माळेगाव व सोमेश्‍वर कारखान्यापैकी सोमेश्‍वर च्या कार्यक्षेत्रातील उसाची पिके अजून बर्‍यापैकी हिरवी आहेत. वीर धरणापासून सुरू होणारे सोमेश्‍वर चे कार्यक्षेत्र व ८५00 एकरावर ठिबक सिंचन योजना ही प्रमुख दोन कारणे ठरू शकतात. मात्र येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे

शनिवार, ३० जून, २०१२

नायझेरियनला पोलीस कोठडी

नवी मुंबई। दि. २९ 
बनावट अमेरिकन डॉलरसह पकडलेल्या कोनका हेन्ड्री (२२) या नायझेरियनची पनवेल न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. 
त्याच्याजवळील बॅगेतून पोलिसांनी बनावट अमेरिकन डॉलर हस्तगत केले आहेत. खारघर येथील मुंबई-पुणे महामार्गावरील हिरानंदानी स्टॉपजवळ हा त्याच्या साथीदारासह बसची वाट पाहत उभा होता. या स्टॉपसमोरच खारघर वाहतूक शाखेची चौकी आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार डी.टी. बळवंत आणि पोलीस नाईक ए.बी. पवार यांना या दोघा नायझेरियनचा संशय आला. ही बाब त्यांनी ठाणे अंमलदार डी.बी. काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही कर्मचार्‍यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हेन्ड्री त्यांच्या हातात सापडला. दुसर्‍या नायझेरियनने हातातील बॅग टाकून तेथून पळ काढला. 
हेन्ड्री याला बॅगेसह खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या बॅगेत अमेरिकन डॉलरच्या ५५ बंडलमध्ये २८१ बनावट डॉलर आहेत. या बंडलमध्ये वर आणि खाली डॉलर लावण्यात आले असून, मध्ये कोरे कागद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांनी दिली. सर्व डॉलरवर एकच सिरियल आहे. आरोपीकडून एक मोबाईल व तोंडाला लावण्याचे मास्क जप्त करण्यात आले आहेत. >त्न/> कोनका हेन्ड्री (२२) या नायझेरियनला न्यायालयात हजर करण्यात आले.

शनिवार, २३ जून, २०१२

सरकार जाणार भाड्याच्या घरात

महाभयंकर आगीनंतर सावरलेल्या सरकारने आज गतीने कामकाज सुरू केले आणि भाड्याच्या जागा शोधण्याची मोहीमही उघडली. कोणत्याही परिस्थितीत सगळी यंत्रणा पूर्ववत करण्याला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सध्या सरकारला सगळे कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी तब्बल १ लाख ५५ हजार स्क्वेअर फूट जागा हवी आहे. एवढी एकत्रित जागा कोठे मिळेल याचा शोध सध्या सुरू झाला आहे. प्रधान सचिव सुमीत मलिक व पी.एस. मीना या दोघांनी ठिकठिकाणच्या जागा शोधण्याचे काम सुरू केले. त्यांनी नऊ ठिकाणच्या जागा पाहिल्या. त्यातल्या एमटीएनएलच्या ३0 हजार स्क्वेअर फूट जागेसाठीचा भाडेकरारही आज तातडीने करण्यात आला.